Thu. Jul 4th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Nukasan Bharpai yadi

Nukasan Bharpai yadi: नमस्कार मित्रांनो, 11 जिल्ह्यांतील 14 लाख शेतकरी मित्रांसाठी भरपाई मदत मंजूर केली आहे. आणि ही भरपाई कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार? हे देखील आपण आज या बातमीत जाणून घेणार आहोत. जून आणि जुलै 2023 या दोन महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्र मध्ये अतिवृष्टी झाली होती. तसेच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पूरपरिस्थितीमुळे शेती पिकांची नुकसानभरपाई मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून 1 हजार 71 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

 

तसेच मित्रांनो, या मदतीचा लाभ महाराष्ट्रातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, जालना, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या 11 जिल्ह्यांतील 14 लाख 9 हजार 318 शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई दिली जाणार आहे.Nukasan Bharpai yadi

 

मित्रांनो, या शेतकरी बंधू-भगिनींच्या खात्यात ही भरपाई मदत रक्कम DBT द्वारे जमा केली जाईल. चक्रीवादळ व अशा इतर नैसर्गिक आपत्तींमुळे शेती पिकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी व शेतकरी मित्रांना पुढील हंगामात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी हे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

लाभार्थी शेतकऱ्यांसाठी पात्रता आणि निकष काय असतील संपूर्ण माहिती

 

मित्रांनो, या मदतीसाठी, चक्रीवादळ, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तींसाठी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या अटी आणि नियमांचे पालन केले जाईल. तसेच, राज्य शासनाच्या अंतर्गत जाहीर केलेली नैसर्गिक आपत्ती असल्यास, विभागात 24 तासांत 65 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून, विभागातील गावांमध्ये 33% पेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झाले आहे.

 

त्यानंतर ही मदत दिली जाईल. विभागातील अतिवृष्टीच्या नियमानुसार. परंतु मित्रांनो, पूरस्थिती असलेल्या ठिकाणी अतिवृष्टीचे निकष लागू होणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी. आणि या मदतीमुळे शेतकरी बांधवांना त्यांच्या आर्थिक नुकसानातून सावरण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नवीन शेती करण्यास प्रोत्साहन मिळेल.

 

Nukasan Bharpai yadi: अतिवृष्टीमुळे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई संपूर्ण यादी खालील प्रमाणे…

 

अमरावती

अकोला

यवतमाळ

बुलढाणा

वाशीम

जालना

परभणी

हिंगोली

नांदेड

लातूर

बीड

 

या 11 जिल्ह्यांतील 14 लाख 9 हजार 318 शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात येणार आहे. या शेतकरी बंधू-भगिनींच्या खात्यात ही भरपाई मदत रक्कम DBT द्वारे जमा केली जाईल.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *