Thu. Jul 4th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Magel tyala milnar vihir

Magel tyala milnar vihir: सरकार देशातील नागरिकांसाठी काहीना काही नवनवीन कल्याणकारी योजना राबवित असते. त्यातच आता मागेल त्याला विहिर या योजनेअंतर्गत देणाऱ्या अनुदानात वाढ करून दिली आहे. त्याचबरोबर काही अटी देखील रद्द करण्यात आले आहेत. चला तर मग नवीन शासन निर्णयानुसार या योजनेत कोण कोणते बदल झाले आहेत. आता या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. अशी संपूर्ण माहिती पाहूया.

मागेल त्याला विहिर या योजनेअंतर्गत सुरुवातीला सरकार कडून लाभार्थी शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. मात्र आता ते अनुदानात मोठी वाढ करण्यात आली आहे. या अनुदानात वाढ करून शेतकऱ्याला आता विहीर खोदकाम करण्यासाठी तब्बल 4 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. वाढत्या महागाईचा विचार करून सरकारने हा शासन निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे देशातील लाखो शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे.

त्याचबरोबर सरकारने या योजनेसाठी जास्तीत जास्त अर्ज करावेत असे शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. ही योजना रोजगार हमी योजनेअंतर्गत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवली जात आहे. या योजनेसाठी पंचायत समिती प्रशासनाला प्रस्ताव सादर करावा लागत आहे.Magel tyala milnar vihir

आपण प्रस्ताव सादर केल्यानंतर आपल्याला या योजनेची मंजुरी मिळाल्यानंतर आपल्या खात्यात डायरेक्ट सगळी रक्कम जमा केली जात नाही. ती रक्कम 4-5 टप्प्यात आपल्या खात्यात जमा केली जाते.

या योजनेचा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याला ग्रामपंचायती मध्ये संपर्क साधावा लागणार आहे. पंचायत समितीमध्ये असलेल्या कर्मचाऱ्याकडून तुम्हाला मागेल त्याला विहिर या योजनेची संपूर्ण माहिती मिळेल. त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्यामध्ये अर्ज सुरू असतील तर तुम्हाला या योजनेचा अर्ज देखील करता येईल.Magel tyala milnar vihir

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *